2015
आजपासुन संकल्प केला दर रविवारी छत्रपति शिवाजी महाराराजांचे ३५० किल्ले बघायचे.
सुरूवात संभाजी राजांच्या समाधीपासुन ( वढु बु।।, तुळापुर) मुजरा राजे आपल्या एका सामान्य मावळ्याचा.
राजमाता जिजाऊ समाधीस्थळ(पाचाड) आणि राजधानी किल्ले रायगडावर डोके टेकवून आलो
किल्ले राजगड महाराणी सईबाईंच्या समाधीला फुले वाहिली
प्रतापगड ,पहाटे खाली टेकलेले आभाळ पाहुन आम्ही खुप भारावून गेलो राजांनी बांधलेला हा गड पाहुन त्याची महती कळुन येते धिप्पाड बुरूज, अनंतात पसरलेला किल्ला आणि तळाशी असलेली अफजलखानाची महाराजांनी बांधलेली समाधी
लोहगड खुपच सुंदर गड अवस्थाही चांगली आहे पुरंदरच्या तहात (1665) दिलेला किल्ला परत महाराजांनी (1670 )जिंकून आणला
किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी, संभाजी महाराजांचे जन्मस्थान
राजमाची ( मनोरंजन गड व श्रीवर्धन गड़) कठीण वाट , बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत असणारे गड , शिवराज्यातले अप्रतिम हिरे व निसर्गाने केलेली किमया
किल्ले वासोटा ; घनदाट जंगलातून रपेट व एक तास बोटीने प्रवास असा बिकट किल्ला
जिजाऊ मातेचा आशिर्वाद, छत्रपतींचे स्वप्न आणि शंभु महाराजांचा आदेश समजुन आम्ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही काल नियोजनबद्ध पार पाडला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरात रोख स्वरूपात दिलेल्या आधाराने आम्हा सर्वांचे ऊर भरून आले
स्वनी खुप मोलाची साथ दिली त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभार मानतो